Saturday, January 23, 2021

धर्मपिठ कार्यध्यक्ष पदी निवड केल्याबद्दल धन्यवाद-विनायक काळदाते.

🍁उपाधीचा भार, आहे कठीण अपार-परी सन्मानाने तुमच्या ऋणी झालो फार 🍁

          विनायक काळदाते.


धर्मपिठाच्या कार्यध्यक्ष पदी माझी निवड करून पिठाच्या सर्वच पदाधिकाऱ्यांनी व संत महंतानी माझ्या क्षमतेवर जो विश्वास टाकला त्याबद्दल मि केंद्रीय अध्यक्ष मा.बापूसाहेब हटकर, संस्थापक अध्यक्ष डॉ. अभिमन्यू टकले साहेब व धर्मपिठाच्या महाराष्ट्रातील सर्वच पदाधिकारी व संतमंडळीचा आभारी आहे,ऋणी आहे.

  अवगुण माझे,जरी होते ठावे l

कसोटीत तुमच्या, मि चपलख उतरावे ll ,समाज शिक्षण, प्रबोधन व संघटनातून सर्वांगीण समाज विकास साधन्याच्या हेतूने कार्यरत धर्मपिठाचे काम पुढे घेऊन जाण्यासाठी माझ्या हातात दिलेली ही पताका मि खाली ठेवणार नाही व तुम्ही टाकलेल्या विश्वासाला तडे जाऊं देणार नाही अशी मि ग्वाही देतो.

   योग:कर्मसु कौशलम् याचा एक अर्थ आपले काम कुशलतेने करणे असा सुद्धा निघतो त्याप्रमाणे धर्मपिठाचे प्रशासकीय कामकाज योग्य पद्धतीने पुढे नेवून हा योग साधन्याच्या माझा नक्की प्रयत्न असेल.येथे कौशल्य म्हणजे निष्काम कर्म असा अर्थ मला अभिप्रेत आहे.निष्काम कर्म करण्यासाठी आवश्यक असते ती समत्वबुद्धी अर्थात कोणत्याही परिस्थितीत विचलीत न होणारी बुद्धी, आपण धर्म पिठाचे सदस्य ति आत्मसात करण्याचा प्रयत्न करु.'मि'पणाची बाधा जोवर होत नाही तो पर्यंत माणसं जुळत राहतात व चळवळ पुढे चालत राहते हे सत्य आहे,त्यामुळे "अंहकाराचा वारा न लागो राजसा l माझिया विष्णु दासा भाविकांसी l या संत वचना प्रमाणे आपण कार्यरत राहू व धर्मपिठाची पताका फडकवत ठेवू असा मला आत्मविश्वास वाटतो.

  संतकाळात जसा दांभिकाचा जोर होता तसाच सुळसुळाट अविचाराचा आज रोजी समाजात झाला आहे.समाजमन विचलित झाले असून काय स्विकारावे व काय सोडावे या प्रश्नामध्ये समाज गुरफटून गेला आहे.

  धर्मपिठावर समाज शिक्षण, प्रबोधन,संघटन करून पुन्हा  समाजाला आर्थिक, लौकिक, पारमार्थिक, सामाजिक व राजकीय दृष्ट्या सशक्त करण्याची जबाबदारी आहे.

विस्कळीत झालेला समाजाला आज वरील मुद्यांवर काम करणाऱ्या अराजकीय संघटनेची गरज आहे व ते काम धर्मपिठ नक्की करु शकते असा मला विश्वास आहे.

    धर्मपिठ ही पंढरीची वारी आहे,या मुख्य दिंडीत भविष्यात अनेक लहान लहान दिंड्या सामिल होतील ,मार्गक्रमण करतील , त्यांना सामावून घेण्याची माणसिकता आपल्याला आत्मसात करावी लागेल.धर्मपिठाची पताका राज्यात, परराज्यातच नव्हे तर विदेशात सुद्धा पसरावी लागेल व तसे व्हिजन व मिशन राबवावे लागेल.संस्थापकाचा मानस असलेली धर्मपरिषदेची तयारी सुरू करावी लागेल, त्याकरिता विभागवार संतमेळावा व धर्मसभेंचे नियोजन करावे लागेल.

  मैअकेला ही चला था जानिब-ए-मंजिल मगर लोग साथ आते गए और कारवाँ बनता गया "या उक्तीप्रमाणे चार दोन समाजधुरीनांनी उभे केलेल्या धर्मपिठाला आज शेकडोंनी प्राध्यापक, डॉक्टर, शिक्षक ,शिक्षिका, वकील, अधिकारी, शेतकरी,कामकरी,माता भगिनी जोडल्या जात आहेत.या सर्वांना अपेक्षित असलेला सर्वांगीण विकासाची धैय्य धोरणे,उद्दिष्टे राबवण्याचा प्रयत्न माझ्या कडून नक्कीच होईल. 

 आपण सर्वांचे सहकार्य, मार्गदर्शन,पाठिंबा आहेच तो यापुढे सुद्धा मिळत राहील व धर्मपिठाचे अलौकिक कार्य पुढे जात राहील असा मला विश्वास आहे.

 पुनश्च एकदा आपल्या सर्वांचे आभार.🙏


✍️विनायक काळदाते

कार्यध्यक्ष,धनगर धर्मपिठ

महाराष्ट्र राज्य.


No comments:

Post a Comment

सांगली येथील पु.अहिल्यादेवी होळकर स्मारक लोकार्पण सोहळ्यास हार्दिक शुभेच्छा.

 पुण्यश्लोक अहिल्यादेवी, होळकर स्मारक लोकार्पण सोहळा सांगली. दि ०२|०४|२०२२. सांगली महानगर पालीकेचा एक अतिशय चागंला उपक्रम.  🕉️🕉️🕉️🕉️🕉️...