धनगर जमातीच्या चळवळी संपवणारे संपले पाहिजेत हेच कै.बि के कोकरे यांना अभिवादन
प्रा. डाॅ.अभिमन्यु टकले
🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️ 🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️धनगर जमातीच्या प्रमाणीक चळवळी संपवणारे संपले पाहिजेत हेच माझे कै. बापूसाहेब कोकरे यांना विनम्र अभिवादन.
श्री बापूसाहेब कोकरे यांनी धनगर समाजाच्या समाज कारणाची लोकशाहीतील पहिली चळवळ १९८८ ला सुरू केली.या संघटनेचे नाव यशवंत सेना का? तर महाराजा यशवंतराव होळकर , शाहू महाराजांच्या मुलगा यशवंत, डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांचा पुत्र यशवंत यांच्या नावाने यशवंत सेना काढण्यात आली. श्री अनिल कुमार वाघे सोलापूर हे पहिले यशवंत सेनेचे सचिव. मी २००३ते२००४ या काळात श्री अर्जुन दादा सलगर बरोबर दोन्ही नेत्यांच्या घरी जाऊन आलो आहे. यशवंत सेना व हे नेते कसे संपवले? का संपवले? कोणी संपवले?याची उत्तरे शोधली? यशवंत सेना धनगर जमातीच्या लोकांनीच सुपारी घेऊन संपवली.दोन्ही नेते विषाणू जन्य जैविक अस्त्र वापरून नष्ट केले. आगोदर वाघे वारले. नतंर कै.बी के कोकरे यांना नष्ट केले.
यशवंत सेना स्थापनेत श्री पांडुरंग गडदे मास्तर मुंबई यांचा मोठा वाटा होता.गडदे मास्तर मुंबई चे अध्यक्ष होते.श्री राजू जांगळे कोकण चे अध्यक्ष होते.श्रीरंग वाघमोडे लोखंडी जथा विभाग अध्यक्ष होते.तर श्री बापूसाहेब हटकर हे सरचिटणीस मुंबई होते.
कै बापूसाहेब यांनी समाज सेवेची डरकाळी फोडली होती आणि महाराष्ट्राची राजकीय गादी थरथरली होती.१९९०ला पंढरपूर आरक्षण मेळावा जाहीर झाला.आषाढी कार्तिकी यात्रा नसताना पंढरपूर यात्रा भरली. कै.बापूसाहेब कोकरे चा ताबा शत्रुने घेतला होता.बापूसाहेबांना थम्स अप मध्ये मद्य घालून पाजले जात होते. बाहेर धनगर जमातीच्या घोषणा चालू होत्या.बापूसाहेब स्टेज वर हडभडत आले आणि एकच वाक्य बोलले यशवंत सेना काँग्रेस मध्ये विलीन करत आहे. नतंर धनगर जमातीला एन टी २आरक्षण मिळाले. बापूसाहेबाना विषाणू जन्य जैविक आजार निर्माण केला गेला होता. जबरदस्ती खिशात पैसे कोंबले होते. महाराष्ट्र राज्याच्या बाहेर जा तेथेच नोकरी कर परत आला तर बघून घेवू म्हणून बापूसाहेब महाराष्ट्र राज्यातून हाकलून लावले. बापूसाहेब परत ससून रुग्णालय पुणे येथे उपचार घेत घेत समाजासाठी शहीद झाले, शेवटची मदत श्री अर्जुन दादा सलगर आणि श्री महादेव जी जानकर यांनी केली.
आज आरक्षणामुळे अनेक अधिकारी, कर्मचारी, डाॅ.ईजिंनियर, प्रशासकीय अधिकारी झाले आहेत.पण आपल्याला सवलत का मिळाली हे विसरून कुटुंबात रममाण होऊन आयुष्याचे भौतिक भोग घेत आहेत.
अनेक ग्रामपंचायत, झेडपी सदस्य या सवलती घेत आहेत. पण आपल्या आईवडील व्यतिरिक्त आपल्या साठी कोणीतरी झगडले आहेत बळी गेलेले आहेत, आयुष्याचा यज्ञ करून स्वत:ची आहुती दिली आहे हे का विसरता? चांगल्या चळवळी संपवण्या साठी आजही प्रस्थापित नालायक लोकांकडून सुपारी घेतली जाते आणि चळवळी संपवल्या जातात. आपलेच लोक चिरीमिरी घेवून बंड करतात आणि चळवळी संपवतात. कै.बापूसाहेब कोकरे चे वादळ दोन तीन वर्षात च संपवण्यात आले.मेळाव्या नतंर बापूसाहेब कोकरेचें काय झाले त्याचा शोध जमातीने का नाही घेतला? त्यांचा शोध घेवून मदत का नाही केली? आजही बापूसाहेब कोकरेच्यां नावाने राज्यात अनेक सामाजिक दुकाने थाटण्यात आली आहेत.विठोजी रावांना पेशव्यांनी हलहल करून मारून टाकले त्याचा बदला म्हणून महाराजा यशवंतराव होळकर यांनी पुणे जाळून टाकले होते व हाडे उरूळी कांचन पर्यंत पसरली होती. पेशवे कोकणात पळून गेले होते.पण बीके कोकरेंचे बलिदान मात्र आजही प्रस्थापितांच्या बिमोडाची वाट पहात आहे.धनगर समाजाच्या चळवळींची अवस्था काशीला निघालेल्या कुत्र्यां सारखीे झाली आहे. मालकांचा आदेश पाळण्या साठी प्रमाणीक पणे टुकड्यावर जगणारी कुत्री ईतर कुत्र्यांना आपला ईलाका ओलांडून देत नाहीत अशी अवस्था आहे.सध्याच्या सर्व सामाजीक राजकीय चळवळी फक्त आणि फक्त आरक्षणाच्या नावावर चालू आहेत. या सर्वाना माहीती आहे आरक्षण मिळणार नाही .तरीही आरक्षणाच्या नावावर कोणी पैसे कमावून हात धुतले,कोणी आमदार खासदार होऊन हात धुतले.काही राजकीय पक्ष सत्तेत आले.धनगर समाज मात्र राजकीय, सामाजिक, अर्थिक, मानसिक रित्या गिरणीत दळला जात आहे.हे थांबले पाहिजे.धनगर जमातीला आरक्षण कसे मिळेल यावरती यांच्याकडे खरे उत्तर नाही. कलयुगात सत्य व धर्म एकटेच निंदा, नालस्ती,आपमान, कष्ट, अन्याय सहन करत असते .या उलट अधर्माचे ,असत्याचे सर्व सोबती आणि संगती असतात. पण लक्षात ठेवा सत्य परेशान हो सकता है पराजित नही.
मराठा समाजाच्या आरक्षणा साठी आण्णासाहेब पाटील यांनी बलिदान दिले त्यांच्या नावाने महामंडळ सुरू झाले,अनेक संस्था स्मारक स्थापन झाल्या पण बि के चा बदला घेणे सोडा आपण व मी एखाद्या चौकात फोटो पुतळा,स्मारक उभा करू शकलो नाही? कसा समाज सुधारणार? बि के चा इतिहास बाहेर आला पाहिजे या साठी साहित्य संमेलनात त्यांच्या नावाचा पुरस्कार सुरू केला.त्यांची प्रतीमा पहिल्या साहित्य संमेलनात प्रथम दर्शनी ठेवण्यात आली. यशवंत सेना सेना पतींचा पुरस्कार देऊन गौरवही केला. या निमीत्ताने मला एकच सांगायचे आहे ज्यांनी ज्यांनी जमातीला, आरक्षण, राजकीय, सामाजिक, अर्थीक रित्या फसवले आहे व चांगल्या चळवळी संपवण्या साठी सुपार्या घेणार्या विषारी सापांना वेळीच ठेचले पाहिजे तरच समाजाचे हित आहे.बि के कोकरे यांच्या नावाने एखादे मध्यवर्ती स्थळ पाहून पुतळा उभा करावा व दरवर्षी या ठिकाणी त्यांना अभिवादन करावे.होळकर घरण्याने देशाचे राजकारण केले.पण बि के कोकरे नी फक्त धनगर जमाती साठी बलिदान दिले.त्यांचा पुतळा एका व्यक्तीकडून, गावाकडून, उभा करू नये तर त्यांचे काम राज्यासाठी होते.राज्याने उभा करावा.बि के ची जिवंत असताना लोकांनी काळजी घेतली नाही. जमातीने आता तरी सावध व्हावे चांगल्या चळवळी संपवनारे, चांगल्या लोकावर भुंकणारे, सुपार्या घेवून जमातीला संपवनारे संपले पाहिजेत. कै.बापूसाहेब कोकरे साहेब तुमच बलिदान व्यर्थ जाणार नाही आम्ही एकत्र येत आहोत, शूर आहोत, षंड नाहीत.आम्ही विठोजीचे बलिदान विसरलो नाहीत. आमच्या विरंगना तुरूंगात टाकून ठार मारल्या हे ही विसरलो नाहीत. बापूसाहेबांची चळवळ कपटाने संपवली आहे व बापूसाहेबांना कपट करून मारलेले आहे हे ही विसरलो नाहीत.तुमच्या बलिदानचे विचार आमच्या मनात आले तरी आमची तळपायाची आग मस्तकात जाते पण लोकशाहीने कायद्याने आमचे हात बांधले आहेत. आम्ही आपले घरातले बाहेरचे शत्रु संयम,शांतता, बुध्दी,एकता यांनी अप्रत्यक्ष रित्या नक्कीच ठेचू तुमच राहीलेले कार्य पुरे करू हीच आमची तुम्हाला विनम्र आदरांजली विनम्र अभिवादन
जय मल्हार
हर हर महादेव
प्रा.डाॅ.अभिमन्यु टकले
संस्थापक
धनगर धर्म पिठ
आदिवासी धनगर साहित्य संमेलन महाराष्ट्र राज्य 💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐♟️💐💐💐💐💐💐💐💐💐




















