Thursday, January 14, 2021

डॉ. विष्णूपंत गावडे यांची धर्मपिठाचे अध्यक्ष म्हणून निवड.

डाॅ विष्णू पंत गावडे धनगर धर्म पीठ महाराष्ट्र राज्य अध्यक्ष पदी निवड हार्दिक अभिनंदन व शुभेच्छा 🛕🛕🛕🛕🛕🛕🛕🛕🛕🛕🛕🛕            -कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषू कदाचन। मा कर्मफलहेतुरभूर्मा ते सङगोस्त्वकर्मणि॥           🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹धनगर धर्म  पीठाची नोंदणी 2018 मध्ये झाली आहे. साहित्य संमेलन आणि धर्म पीठ हे दोन महत्वाचे व्यासपीठ लोकशाही मध्ये लोक  प्रबोधनाचे खूप मोठे कार्य करू शकतात व करत आहेत..अध्यात्म हे एक माणसिक निरोगी रहाण्यासाठी आरोग्याचा  महत्वाचा घटक व गरज आहे. मानवाच्या प्रत्येक गरजेचा व्यावसाय झालेला आहे. धर्म स्थळे   काही ठिकाणी बाजार स्थ्ळे झाली आहेत. स्वातंत्र्य मिळून ७०वर्षे लोटली आहेत परंतु अनेक लोक आजही अध्यात्मिक ज्ञानापासून कोसो दूर आहेत.प्रत्येक व्यक्तीला धर्म स्वातंत्र्य आहे. परंतु धर्म ज्ञान व अध्यात्म  प्रसार करण्यासाठी  शासनाने आजता गायत कोणतीही पावले उचलली नाहीत.अनेक कर्तुत्वान तरूण चंगळवाद व भोगवादाच्या विळख्यात अडकून निराशा पोटी आत्महत्या करत आहेत.अनेक लोक मानवी व्यवस्थेच्या गैरकारभाराचे बळी ठरत आहेत.मानवी व्यवसथेचे सेवक स्वतःला राजे समजतात. तर धर्म व्यवस्थेचे लोक स्वतःला  देव समजतात. या बाजारात सेवा व धर्म विकला गेला आहे. या सर्व बाबीचा विचार करून डाॅ विष्णू पंत गावडे मानसोपचार तज्ञ यांनी धर्म सेवा करण्याचे ठरवले होते.त्या अनुषंगाने मा.बापुसाहेब हटकर केंद्रीय अध्यक्ष , अध्यात्मिक गुरू बी.टी. गुरव सर  मा.संभाजीराव सुळ. उपाध्यक्ष साहित्य संमेलन. क्रुष्णा बुरूंगले, अर्जुन सलगर, व अनेक मान्यवरांनी डाॅ   विष्णू पंत गावडे यांच्या नावाला पसंती दिली.त्यांची  धर्म पीठाच्या महाराष्ट्र अध्यक्ष पदी निवड केली. डाॅ विष्णू पंत गावडे मानसोपचार तज्ञ यांचे अभिनंदन व शुभेच्छा.                                 डाॅ विष्णू पंत गावडे यांचा परिचय: डाॅ विष्णू पंत गावडे बोरामणी ता.दक्षिण सोलापूर जि.सोलापूर येथील रहिवासी आहेत. त्यांचे शिक्षण एमबीबीएस,  डिपीएम,झाले असून ते नामवंत मानसोपचार तज्ञ आहेत. त्यांच्या सुविद्य पत्नी ईएनटी सर्जन आहेत.त्यांचे स्वतःचे रूग्णालय आहे . त्यांचे रूग्ण सेवा,समाज सेवा, राजकारण, साहित्य सेवा या मध्ये खूप मोठे योगदान आहे.त्यांनी यशवंत सेनेमार्फत समाज सेवा केली आहे. राष्ट्रीय समाज पक्षाच्या कार्यकर्त्यांना मदत केली आहे. धनगर दलित मुस्लिम यांचे राजकिय  समिकरण राज्यात राबवण्यासाठी महाराष्ट्र राज्यात एमआयएम आणण्यासाठी डाॅ अभिमन्यू टकले व  अर्जुन सलगर यांच्या बरोबर मोठा प्रयत्न केला. एमआयएम मधून २०१४ची विधानसभा  निवडणूक लढवली. धनगर जमातीच्या चार उमेदवारांनी सोलापूर येथे 94000 मतदान घेतले होते. ईतिहास घडवला होता.सोलापूर विद्यापीठ नामातंर लढा थंड झाला होता डाॅ गावडे यांनी काही कार्य कर्ते विद्यापीठा समोर उपोषण करण्या साठी बसवले होते व  लढा प्रचंड पेटत ठेवला होता.त्यांनी पहिल्या आदिवासी  धनगर साहित्य संमेलन चे संयोजक म्हणून ही काम केले  आहे. त्यांनी साहित्य संमेलन साठी १० लाख रुपयांची नविन बोलेरो गाडी मोफत दिली होती.डाॅ अभिमन्यू टकले संस्थापक अध्यक्ष आदिवासी धनगर साहित्य संमेलन यांनी संमेलन झाल्यानंतर ती गाडी परत केली. अशा प्रकारे डाॅ विष्णू पंत गावडे मानसोपचार तज्ञ यांचे समाजा साठी महत्वपूर्ण योगदान आहे. डाॅ गावडे यांनी लवकरच धर्म संमेलन आयोजित करण्याचा संकल्प केला आहे. या माध्यमातून धनगर जमात त्यांची धार्मिक दैवते, धार्मिक ग्रंथ,वेद,सिध्द सांप्रादाय,  यावर  धार्मिक तज्ञाकडून प्रकाश टाकला जाणार आहे. अनिष्ट रुढी परंपरा व्यसने नाहीसे करण्याचा प्रयत्न केला जाईल.  रिलीजीयन म्हणजे धर्म. रिलीजीयन म्हणजे लोकांना एकत्र करून ठेवणारा व योग्य दिशा देनारा  मार्ग.साहित्य लोकांचा स्वाभिमान जागा करते. तर धर्म स्वाभिमानी लोकांना एकत्र  करण्यासाठी मदत करते. साहित्यसंमेलनामुळे आमचा  स्वाभिमान जागा झाला आहे तर धर्म संमेलनामुळे आम्ही  स्वाभिमानी एकत्र येणारच आणि  आमच्या सुख शांती उन्नती  सम्रुद्धी साठी प्रयत्न करणार  . लाॅक डावून संपताच हा  धर्माच्या इतिहासातील ऐतिहासीक  सोहळा धर्म  संमेलन होणारच. अशा प्रकारे डाॅ विष्णू पंत गावडे एक बुद्धीजीवी समाज सेवक आहेत. त्यांचे अभिनंदन व त्यांच्या कार्याला हार्दिक हार्दिक शुभेच्छा.समस्त धनगर परिवार महाराष्ट्र राज्य शुभेच्छुक डाॅ अभिमन्यू टकले संस्थापक अध्यक्ष धनगर साहित्य संमेलन व धनगर धर्म पिठ महाराष्ट्र राज्य. गुरूवर्य प.पू.डाॅ  बि. टी गुरव सर.  श्री बापुसाहेब हटकर केंद्रीय अध्यक्ष धनगर धर्म पीठ मा.आमदार,हरिदासजी भदे साहेब . श्री बापुसाहेब शिंदे उपाध्यक्ष. मा.संभाजी सुळ उपाध्यक्ष धनगर साहित्य संमेलन व संचालक डिसीसी बॅंक लातूर. मा.संजयजी सोनवनी अध्यक्ष पहिले आदिवासी धनगर साहित्य संमेलन महाराष्ट्र राज्य. मा.प्रकाशजी खाडे समाज सेवक. मा ऐडव्होकेट आण्णा राव पाटील महाराष्ट्र वीकास आघाडी लातूर.  मा.चंद्रकांत जी हजारे प्रवक्ते आंबेजोगाई. मा.क्रुष्णा बुरूंगले संचालक धर्म पीठ. मा.डाॅ मुरहरी केळे कार्यकारी संचालक विजवितरण त्रिपुरा राज्य व अध्यक्ष तिसरे धनगर साहित्य संमेलन. बाळासाहेब कर्णवर उपाध्यक्ष श्री श्री सदगुरू  साखर कारखाना राजेवाडी. मा.प्रा. संजयजी शिंगाडे स्वागताध्यक्ष आदिवासी धनगर साहित्य संमेलन सांगोला. प्राचार्य आर एस चोपडे सर अध्यक्ष अहिल्या शिक्षण संस्था सांगली व आदिवासी धनगर साहित्य संमेलन सांगोला. मा.अर्जुन सलगर अध्यक्ष सम्राट मौर्य सेना महाराष्ट्र राज्य. मा.रमेश गावडे धर्म व समाज सेवक सोलापूर.मा.विनायक काळदाते लेखक पत्रकार नाशीक. हभप विनायक दिवनाले नाशिक.शेखर बंगाळे जि.अध्यक्ष महाराष्ट्र वीकास आघाडी सोलापूर.🛕🛕🛕🛕🛕🛕🛕🛕🛕🛕🛕🛕🛕🛕🛕🛕🛕🛕🛕

No comments:

Post a Comment

सांगली येथील पु.अहिल्यादेवी होळकर स्मारक लोकार्पण सोहळ्यास हार्दिक शुभेच्छा.

 पुण्यश्लोक अहिल्यादेवी, होळकर स्मारक लोकार्पण सोहळा सांगली. दि ०२|०४|२०२२. सांगली महानगर पालीकेचा एक अतिशय चागंला उपक्रम.  🕉️🕉️🕉️🕉️🕉️...