धर्मपिठ

Tuesday, March 29, 2022

सांगली येथील पु.अहिल्यादेवी होळकर स्मारक लोकार्पण सोहळ्यास हार्दिक शुभेच्छा.


 पुण्यश्लोक अहिल्यादेवी, होळकर स्मारक लोकार्पण सोहळा सांगली. दि ०२|०४|२०२२. सांगली महानगर पालीकेचा एक अतिशय चागंला उपक्रम. 

🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️

कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन l  मा कर्मफलहेतुरभूर्मा ते संङ्गोस्त्वकर्मणी ll☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️

सध्या सोशल मिडीया आणि प्रिंट मिडीयात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारक सांगली हे चांगलेच गाजत आहे.

 सांगली महानगर पालिकेत श्री विष्णु माने हे जमातीचे एक कर्तव्यदक्ष, कर्तव्य निष्ठ, समाज निष्ठ कर्तुत्वान अनेक वेळेस जनतेने निवडून दिलेले नगरसेवक आहेत.श्री

विष्णु माने राष्ट्रवादी काँग्रेस यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा आदर्श असा राजकीय, धार्मिक,सामाजिक, सांस्कृतिक ईतिहास सांगली जिल्ह्य़ातील लोकांपर्यंत पोहचला पाहिजे. आदर्श तरूण पिढी निर्माण झाली पाहिजे,लोकांनी पुस्तक वाचली पाहिजेत. या साठी पुण्यश्लोक धअहिल्यादेवी होळकर यांच्या नावाने काही तरी झाले पाहिजे या हेतूने त्यांनी विचार केला.त्यांनी तो विचार आचरणात आणला आणि कर्तुत्वान असल्याचे सिद्ध केले.श्री विष्णु माने यांनी सर्व राजकीय पक्षातील नगरसेवक  २०११ साली एकत्र केले आणि तत्कालीन महापौर डाॅ.नितीन सावगावे यांना घेऊन जयंत पाटील यांना भेटले. श्री जयंत पाटील यांनी हिरवा झेंडा दाखवला आणि स्मारका साठी जमिनीची शोधा शोध सुरू झाली.शहरात जमिन मिळेना. मग विष्णु माने हे रघुवंश सोसाटीचे सदस्य आहेत. त्यांनी रघुवंश सोसायटीची करोडो रूपये किमत असलेली पाऊण एकर जागा सोसायटीचे अध्यक्ष आणि सचिव यांच्या मार्फत महानगर पालीकेस दिली. अशा तर्हेने अहिल्यादेवी होळकर स्मारक सांगलीचे काम  २०१२ ला भूमी पुजन करून सुरू झाले. नंतर महानगर  पालीकेत व राज्यात भाजपची सत्ता आली तरीही ज्येष्ठ नगरसेवक श्री विठ्ठल खोत यांच्या सौ. संगिताताई खोत भाजप महापौर झाल्या. नगरसेवक सरगर,नगरसेवक हुलवान असे सर्व नगरसेवक. तसेच सर्व जाती धर्माचे नगरसेवक एकत्र येऊन स्मारकाचे काम चालूच ठेवले. भव्य दिव्य कमान. सुंदर असे कंपाऊंड. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा मिक्स  धातूचा पुतळा. पुतळ्याचा मंडप अगदी सुंदर असाच आहे.शेजारी ऐतिहासिक पुस्तकासाठी ग्रथांलय उभारले आहे.कपांउड भितींवर आतील बाजूस ऐतिहासिक चित्रांची सजावट केलेली आहे.सांगली महानगर पालीकेने आज पर्यंत पावणे दोन कोटी रूपये खर्च केलेला आहे. उद्घाटन सोहळा मा.महापौर संगिताताई खोत यांच्या कार्य कालात होणार होता. सांगलीचा महापूर, कोरोना अशा संकटांना संगिताताई यांनी सक्षम पणे हताळले आणि शहराची  कमान सांभाळली.कोरोना आला आणि स्मारक समर्पण सोहळा लांबनीवर पडला.सांगली 

महानगर पालीके मार्फत आणखीही जोरदार पणे काम काज सुरूच आहे.

रघुवीर सोसायटीचे अध्यक्ष सुभाष देसाई यांनी ग्रथांलयाच्या पुस्तकासाठी पन्नास हजार रूपये जाहीर केले आहेत.

मी सांगलीत साहित्य संमेलन बैठकीला गेल्यानंतर श्री विष्णु माने, श्री विठ्ठल खोत, सौ संगिताताई खोत यांनी महापौर होण्यापूर्वी व नंतर नेहमीच सहकार्य केले आहे. 

सांगली मध्ये सर्व पक्षीय धनगर जमात  नगरसेवक एकत्र पणे काम करत असतात. करत आहेत. 

सौ संगिताताई खोत मा.महापौर सांगली

यांच्या कर्तुत्वाची दखल घेत त्यांचा आदिवासी धनगर साहित्य संमेलन महाराष्ट्र राज्य म्हसवडचे स्वागताध्यक्ष मा.बाळासाहेब कर्णवर पाटील यांनी साहित्य संमेलनात भव्य राज्य स्तरीय सत्कार केलेला आहे.

तसेच विष्णु  माने यांनाही साहित्य संमेलनात राज्य स्तरीय यशवंतराव होळकर पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे.

अशा या बहुचर्चित पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर स्मारक अर्पण सोहळा दि. २|०४|२०२२ रोजी सांगली येथे गुडीपाडव्याच्या मुहुर्तावर दुपारी ०४ वाजता करण्यात येणार आहे. तरी सांगली जिल्ह्य़ातील व महाराष्ट्र राज्यातील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर प्रेमींनी हजर राहण्यासाठी सोसेल मिडीयात निमंत्रण देण्यात आली आहेत. राज्य भरातून जमातीची मान्यवर मंडळी स्मारकाला भेटून जात आहेत. माजी आमदार व भाजप जिल्हाध्यक्ष हिगोंली,रामराव जी वडकूते .डाॅ.बाबाहेब देशमुख स्वर्गीय गणपतराव देशमुख यांचे वारस व शेकाप नेते हेही भेट देवून गेले आहेत. 

 लोकशाही मध्ये  राजकीय नाट्य झालीच पाहीजेत. तो विरोधकांचा हक्क असतो.राजकीय नाट्यामुळे दोन गोष्टी घडतात एक तो कार्यक्रम राज्य भर प्रसिद्ध होतो.विरोधक जागरुक असल्याचे राज्य भरातील लोकांना समजते. या ठिकाणी विरोध झाल्यामुळे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर स्मारक सांगली हे कार्य व कार्यक्रम मुंबई ते पुणे आणि कोल्हापूर ते नागपूर असा चांदा ते बांधा प्रसिद्ध झाला आहे.विरोध होण्याचे दुसरे एक महत्वपूर्ण कारण आहे. लोक शाहीत राज सत्ता मिळवण्यासाठी वोट बँक ला महत्त्व असते.धनगर जमात राज्यात जरी दोन नंबर असली तरी पश्चिम महाराष्ट्र व मराठवाडा  या विभागात एक नबंर आहे.त्यामुळे वोट बँक टिकवण्या साठी उद्घाटन नाट्य असने स्वभावीक आहे.पश्चिम महाराष्ट्र आणि मराठ वाड्यात धनगर जमात एकत्र येवू नये या साठी राजकीय पक्ष वाट्टेल  ती किंमत मोजायला तयार असतात.तोडा, फोडा आणि राज्य करा असे धोरण आहे.जमातीच्या नेत्यांनी हुशारीने वागावे.राजकीय पक्ष वापर करून  फेकून देतात. माजी आमदार  मा.रामहरी रुपनवर .माजी आमदार मंत्री स्वर्गीय गणपतराव देशमुख, मा.आमदार रामराव वडकूते, मा.माजी मंत्री राम शिंदे साहेब .माजी आमदार मा. हरिदास जी भदे   राजकारण जरूर करतात पण जमातीचे कार्य असेल तर पक्षाचे जोडे सभागृहा बाहेर काढून येतात त्या मुळे आजही ते जमाती साठी आदरणीय आहेत आणि सदैव रहातील .तसेच या मान्यवरांनी जातीचे राजकारण कधीच केले नाही.यांनी जात कधीही राजकीय डावावर खेळली नाही.

स्वतःचा राजकीय स्वार्थ साधन्या साठी एखादा मडंप टाकून कार्यक्रम घेणे सोपे असते.पण समाजा साठी समर्पित भावनेने काम करणे व कार्य करून ठेवणे महा कठीण असते.मा.नगरसेवक विष्णू माने गेले दहा ते अकरा वर्षे झाले अहिल्याबाई होळकर स्मारका साठी कष्ट करत आहेत. मा.विष्णू माने खरोखर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर प्रेमी आहेत.कारण अकरा वर्षांत सांगली महानगर पालिकेत अनेक राजकीय व शासकीय पदाधिकारी आणि अधिकारी येवून गेले विष्णु माने आणि रघुवंश सोसायटी यांनी  जातीने लक्ष घालून  पुण्यश्लोक  अहिल्यादेवी होळकर स्मारक पुर्ण केले. महाराष्ट्र राज्यातील जमाती मध्ये  प्रमाणीक पणे समाजासाठी काम करणारे लोक आहेत.  समाजात वर्गणी गोळा करून कार्य क्रमाच्या नावाखाली उदरनिर्वाह करणारे आहेत.काही फक्त बोल बच्चन आहेत आणि कर्तव्यशुन्य आहेत.काही लबाड आणि भामटे आहेत, समाजाच्या जिवावर राजकीय पदे मिळवतात लवकर संपून जातात. पण आजही धनगर जमाती मध्ये अनेक प्रमाणीक पणे मनोभावे कार्य करणारे विष्णू माने सारखे सज्जन लोक आहेत. त्यांना मदत करणारे ज्येष्ठ नगरसेवक विठ्ठल खोत, संगिताताई खोत,हरिदास जी लेंगरे असे लोक आहेत. तसेच सर्व पक्षीय  सांगलीतील नगरसेवक यांनीही मदत केलेली आहे. कावळ्याच्या घरट्यात कोकीळा अंडी घालून पळून जाते म्हणून ते घरटे कोकीळेचे होत नाही.सरकरी काम हे  कावळ्याच्या घरट्या सारखे असतात, काम एक करतो तर उद्घाटन दुसराच करतो.पण विष्णू माने हे उधार मतवादी आहेत ते भाजप सरकारच्या काळातही त्याच्यांकडून उद्घाटनास तयार होते. पण ते नशिबवानही आहेत त्यांची सत्ता महानगर पालीकेत आली आणी उद्घघाटन संधीही त्यांना मिळाली.दि.०२|०४|२०२२ दुपारी ०४ नंतर गुडी पाडव्याच्या मुहुर्तावर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारक लोकार्पण सोहळा आहे. कार्यक्रमास हार्दिक हार्दिक शुभेच्छा.पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी कधीही जाती साठी काम केले नाही. धर्मासाठी जरूर केले पण धार्मिक असहिष्णूता केली नाही. अखंड हिंदुस्थान आणि हिंदू धर्माच्या रक्षण आणि उन्नती साठी आदर्श राज्य केले. आपणही या आदर्श मातेचा वारसा जतन करत एकत्र येऊन चांगले कर्तुत्व बजावनार्या लोकांबरोबर उभे राहीले पाहीजे. त्यांचा गौरव केला फाहीजे. ज्यांना शक्य असेल त्या सर्व खरोखर अहिल्या प्रेमी लोकांनी भव्य  व देखण्या स्मारक लोकार्पण कार्यक्रमास हजर रहावे, भेट द्यावी. 

लेखक:

डाॅ. अभिमन्यु टकले. 

प्रसिद्धी प्रमुख:

रेशमा ठोंबरे सांगली. 

आदिवासी धनगर साहित्य संमेलन महाराष्ट्र राज्य .

धनगर धर्म पिठ महाराष्ट्र राज्य.🔯🔯🔯🔯🔯🔯🔯🔯🔯🔯🔯🔯🔯🔯🔯🔯🔯🔯🔯🔯🔯🔯

Monday, February 7, 2022

धर्मपीठातर्फे स्व.लता मंगेशकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण.

 💐स्व.लता मंगेशकर यांना   धर्मपीठ सत्संगाकडून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण.💐


   भारतरत्न, गानकोकीळा स्व.लता मंगेशकर यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी सोमवार दिनांक ७ फेब्रुवारी २०२२ रोजी धर्मपीठाच्या विशेष सत्संगाचे आयोजन करण्यात आले होते.

सौ.सुलोचनाताई मेहत्रे यांनी सुरुवातीला "इतनी शक्ती हमे देना दाता-मनका विश्वास कम ना हो'हे गीत गायले.

   ह.भ.प.नंदकिशोर महाराज कोल्हे,ह.भ.प.प्रल्हाद महाराज कळंब यांनी अध्यात्मिक उदाहरणे देत स्व.लतादिदींना श्रद्धांजली वाहली.लतादिदींचा स्वर हा ईस्वर होता,त्यांनी केलेले गायन ही स्वरांची उपासना होती,आराधना होती,ईश्वराची प्रार्थनाच होती असे सांगितले.

      प्रा.डॉ. अभिमन्यू टकले यांनी लतादिदींच्या आयुष्याचा जिवनपट सांगितला.

        ह.भ.प.कचरे महाराज यांनी लतादिदी व राष्ट्रसंतांच्या भेटीची गोष्ट सांगितली.ह.भ.प घोंगे महाराज, घोडस्कर महाराज, ह.भ.प.प्रभाकर दिवनाले महाराज यांनी आपल्या श्रद्धांजली पर भाषणात लतादिदी ह्या दैवीशक्ती प्राप्त असलेल्या गायिका होत्या व त्यांनी स्वरांच्या माध्यमातून केलेली सेवा ही देशसेवा,जनसेवा व ईश्वर सेवाच होती असे प्रतिपादन केले. 

   मा.आर.पि.कुवर साहेब,ज्ञानेश्वरजी ढोमणे यांनी सुद्धा आपल्या शब्दसुमनांनी लतादिदींना श्रद्धांजली वाहली.

     सौ.समिक्षाताई उपासे,पुजाताई गडदे,नंदाताई चापले,प्रा.डॉ.रक्षाताई महाजन,विजयाताई हाके,रंजनाताई कोकणे,रंजनाताई लांडे यांनी सुद्धा स्व.लतादिदींनी गायलेले अभंग, भक्तीगीत सादर करून  आपली श्रद्धांजली अर्पण केली.

    सौ.रेश्माताई ठोंबरे यांनी पसायदान सादर करून धर्मपीठाच्या श्रद्धांजली पर सत्संगाची सांगता केली.

विनायक काळदाते

धनगर धर्मपीठ,महाराष्ट्र राज्य.








Monday, January 24, 2022

🚩आता तरी पुढे हाची उपदेश l नका करु नाश आयुष्याचाll 🚩

 🚩आता तरी पुढे हाची उपदेश l नका करु नाश आयुष्याचाll 🚩



  🕉️५३ वा धर्मपीठ सत्संग संपन्न🚩

    

 धर्मपीठाच्या ५३व्या सत्संगात हरिपाठाच्या २४ व्या अभंगावर निरुपण करताना ह.भ.प. कळंब महाराज-ह.भ.प.दिवनाले महाराज यांनी सांगितले

 वित्त गोत कुळ शील मात l भजकां त्वरित भावना युक्त ll 

   उपासनेचे जे अनेक मार्ग आहेत त्यांत भजन म्हणजे नामस्मरण हेच सर्वात श्रेष्ठ व सुलभ असल्यामुळे संतानी जगाला याच मार्गाचा उपदेश केला आहे.ज्ञानेश्वर माऊली सांगतात तू सुद्धा भजनाचा मार्ग धर,शुद्ध भावाने युक्त होऊन त्वरीत म्हणजे विलंब न करता, यापुढे तरी आपले आयुष्य भजन-नामस्मरणाच्या मार्गाला लाव.

 ह.भ.प.नंदाताई चापले यांनी आपल्या प्रवचनात  "जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती" असे प्रतिपादन केले.

ह.भ.प.कचरे महाराज, घोंगे महाराज, घोडस्कर महाराज यांनी सुद्धा मार्गदर्शन केले.

डॉ. अभिमन्यू टकले यांच्या उपस्थितीत सकाळी धर्मपीठ नागपूर महिला अध्यक्ष प्रा. डॉ.रक्षाताई महाजन(खडसे)यांच्या "धनगर-एक शोध"या पुस्तकाचे प्रकाशन झाले,डॉ. टकले यांनी ताईंच्या कार्याचा सत्संगात गौरव केला.

सौ.प्रज्ञाताई पेशवे, समिक्षाताई उपासे यांनी भक्तीगीत सादर केले.मा.विनोदजी ढोरे साहेब, कुवंर साहेब यांनी सुद्धा सत्संगाच्या कार्याबद्दल समाधान व्यक्त केले.ज्ञानेश्वर ढेपले ,लक्ष्मण पातोंड यांनी सुद्धा आपले विचार व्यक केले.

श्री.ज्ञानेश्वरजी ढोमणे यांनी सर्वांचे आभार मानले व सौ.रेश्माताई ठोंबरे यांनी पसायदान सादर करून सत्संगाची सांगता केली.

सत्संगाला वक्त्यांसोबतच प्रा.संजय शिंगाडे,प्रा.शशिकलाताई सरगर,प्रा.प्रितीताई नवलकर,प्रमिलाताई फणसे,कमलताई बंडगर,संपादक विजय हुबाले पत्रकार सुनील धनगर,मंगेश चराटे,शंकरराव पारेकर,शिवगनेश देवकर,संतोष पेशवे,संतोष कोगदे,विनायक नवलकार,समर्थ लासूरकर व ईत्यादी श्रोते उपस्थित होते.


विनायक काळदाते

कार्याध्यक्ष,धनगर धर्मपीठ.


सौ.रेश्माताई ठोबरे

प्रसिद्धी प्रमुख

धनगर धर्मपीठ.


🚩🕉️🚩🕉️🚩🕉️🚩🕉️🚩

Monday, January 17, 2022

🚩तोंडाळासीं भांडों नये | वाचाळासीं तंडोंनये | संतसंग खंडूं नये | अंतर्यामीं ||

 🚩तोंडाळासीं भांडों नये | वाचाळासीं तंडोंनये |

संतसंग खंडूं नये | अंतर्यामीं ||



🕉️धर्मपीठाचा ५२वा सत्संग संपन्न🚩

सत् संगती सदा घडोlसुजन वाक्य कानी पडो या उक्तीप्रमाणे  अनेक धर्मसेवक व समाजसेवकांच्या उपस्थितीत धर्मपीठाचा ५२वा सत्संग उत्साहात पार पडला.

 ह.भ.प.नंदकिशोर महाराज कोल्हे यांनी  हरिपाठाच्या २३व्या अभंगावर निरुपण करताना विद्वानांची लक्षणे सांगितली.रेड्याच्या तोंडातून माऊलींनी वेद वदवून कसे घेतले व स्वताला विद्वान समजणाऱ्या चांगदेवाला सुद्धा कशी जाण करून दिली याचे वर्णन केले.

ह.भ.प.प्रल्हाद महाराज कळंब यांनी विष्णूसहस्त्रनामावर प्रवचन करतांना भगवंताच्या विविध नामांचे स्पष्टीकरण करताना ईश्वराचे एक नाव भिषज म्हणजे वैद्यक सुद्धा आहे जो सर्व रोग दूर करतो असे उदाहरण दिले.'जगाच्या कल्याणा संताच्या विभूती'या उक्तीप्रमाणे संत हे जगाची काळजी करणारे असतात, त्यांचा संग लाभण्यासाठी पूर्वजन्माचे पुण्यच लागते व सत्संगाला हजेरी भाग्यवानच लावू शकतात हे विशद केले.

ह.भ.प.घोंगे महाराजांनी हरिपाठातील २३व्या अभंगाचे गायन केले तर ह.भ.प.कचरे महाराज, दिवनाले महाराज,डॉ. अभिमन्यू टकले,माजी तहसीलदार श्री.कुवर साहेब, पप्पू बुरुंगले यांनी मार्गदर्शन केले.

सौ.समिक्षाताई उपासे,सुलोचनाताई मेहत्रे,सौ.रंजनाताई कोकणे यांनी भक्ती गीत गायन केले तर सत्संगाची तांत्रीक बाजू हाताळत सौ.रेश्माताई ठोंबरे यांनी पसायदान सादर करीत सत्संगाची सांगता केली.


✍️विनायक काळदाते

Monday, January 10, 2022

"मन करारे प्रसन्न-सर्व सिद्धीचे कारण" नामस्मरणातून माणसिक शांतता व प्रगती होते:-ह.भ.प.प्रल्हाद महाराज कळंब.

 🕉️नित्य नेम नामी तो नर दुर्लभ। लक्ष्मीवल्लभ तयांजवळी ॥

  🚩धर्मपीठाचा ५१वा सत्संग संपन्न.🚩

  धार्मिक व्यासपीठावरुन प्रबोधन करून सर्वांगीण समाज विकास साधन्याच्या हेतूने कार्यरत धर्मपीठाच्या ५१ सत्संगात हरिपाठाच्या २२व्या अभंगावर निरुपण करतांना ह.भ.प.प्रल्हाद महाराज कळंब यांनी जिवनात विकासासाठी मनाची शांती पाहिजे, शांत मन नामस्मरणाच्या माध्यमातून समाधान मिळवून आनंदाची प्राप्ती करून घेत असते असे सांगितले.

 सुखी माणूस तोच आहे जो समाधानी आहे  म्हणून जो नित्य नामस्मरण करतो,चालता बोलता नामस्मरणात तल्लीन राहतो त्याच्या जवळ लक्ष्मीचा पती विष्णू वास करत असतो व त्याला सुख समाधान प्राप्त होत असते असेही आपल्या निरुपणातून महाराजांनी सांगितले. 

सध्या अफाट अशी भौतिक सुविधा समोर असताना माणसाला समाधान नाही, समाधान नाही म्हणून सुख नाही व सुख नाही म्हणून शांतता नाही. माणूस सुख शोधत फिरत असतो परंतु त्याला योग्य मार्गदर्शन न मिळाल्यामुळे त्याची फरफट होत आहे.धर्मपीठ जिवनातील सर्वागीण प्रगती साधन्यासाठी मार्गदर्शन करणारे व्यासपीठ आहे व सत्संग,नामस्मरण ही त्यावरील मात्रा आहे.

या धावपळीच्या युगात मि पणाचा आव सोडून आपले नित्यकर्म करत असताना माणसाने नामस्मरण केल्यास त्याला आत्मिक बळ लाभून कार्य करण्यासाठी उर्जा लाभते व यश लाभण्याची शक्यता वाढते असेही प्रतिपादन महाराजांनी आपल्या निरुपणातून केले.

सौ.पुष्पाताई करे यांनी हरिपाठाच्या २२व्या अभंगाचे गायन केले व त्यानंतर ह.भ.प.प्रल्हाद महाराज कळंब यांनी २२व्या अभंगावर आपले निरुपण केले.

  ह.भ.प.कचरे महाराज, घोंगे महाराज, घोडस्कर महाराज यांनी सुद्धा  प्रबोधन केले.

   समाजाचे जेष्ठ अभ्यासक डॉ. मधुकर राव सलगरे,डॉ. अभिमन्यू टकले,बापूसाहेब हटकर, प्रा.शशिकलाताई सरगर,नंदाताई चाफले, ज्योतीताई गाडगे,प्रमिलाताई फणसे, ई.आपले विचार मांडले.

जेष्ठ अभ्यासक डॉ. मधूकरराव सलगरे यांनी धर्मपीठाच्या माध्यमातून समाजाचा गौरवशाली ईतिहास पुढच्या पिढीकडे हस्तांतरीत होण्याची अपेक्षा केली व डॉ. अभिमन्यू टकले यांनी धर्मपीठ याच दिशेने मार्गक्रमण करीत असल्याची ग्वाही दिली.

सौ.सुलोचनाताई मेहत्रे,रंजनाताई कोकणे,पुष्पाताई करे यांनी गायन केले.

सौ.रेश्माताई ठोंबरे यांनी सत्संगाची तांत्रिक बाजू सांभाळली.


✍️विनायक काळदाते.


Tuesday, January 4, 2022

धर्मपीठाचा ५०वा सत्संग संपन्न !!

 🚩संत सज्जनांचा मेळा । त्यासि लोटांगण घाला llतेथे जाउनि उभे रहा ll

 🚩धर्मपीठाचा ५०सत्संग संपन्न🔱

  धार्मिक व्यासपीठावरुन प्रबोधन करीत समाजाच्या आध्यात्मिक, धार्मिक, शैक्षणिक, आरोग्य, सामाजिक  राजकीय विषयांवर चर्चा करून समाजाची सर्वांगीन प्रगती साधन्याच्या हेतूने कार्यरत धर्मपीठाचा ५०वा साप्ताहिक आँनलाईन सत्संग सोमवार दिनांक ३जानेवारी २०२२रोजी संध्याकाळी ७वाजता पार पडला.

  सत्संगाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून मा.आ.रामरावजी वडकुते साहेब, त्रिपुरा राज्याचे विद्यूत विभागाचे प्रमुख व ज्यांचा संत साहित्याचा खोल अभ्यास आहे असे डॉ. मुरहरी केळे साहेब उपस्थित होते.

   ह.भ.प.नंदकिशोर महाराज कोल्हे यांनी हरिपाठाच्या २१व्या अभंगावर निरुपण केले तर ह.भ.प.प्रल्हाद कळंब यांनी विष्णूसहस्त्रनामावर निरुपण केले.ह.भ.प.कचरे महाराज, घोंगे महाराज, घोडस्कर महाराज,ह.भ.प.दिवनाले महाराज यांनी सुद्धा आपले प्रवचन केले.

  मा.आ.वडकुते साहेबांनी धर्मपीठाकडून सुरू असलेल्या सत्संगाची आवश्यकता व महत्त्व विषद करून  मानसिक शांतते करीता सत्संग हा राजकारणी,समाजकारणी व सर्वांसाठीच आवश्यक असल्याचे सांगितले.

  संत साहित्याचे गाढे अभ्यासक ,महावितरणचे माजी अधिकारी व सध्या त्रिपुरा राज्याचे विद्यूत विभागाचे संचालक असलेले डॉ. श्री.मुरहरी केळे साहेबांनी धर्मपीठाच्या कार्याचे कौतुक करतांना धार्मिक व आध्यात्मिक विचारांमधील फरक सांगितला,सत्संग हा कौटुंबिक संस्काराप्रमाणे एक प्रकारचा सामाजिक संस्कारच असल्याचे सांगितले.

नागपूर जि. प.माजी अध्यक्ष श्री.पुरुषोत्तमजी डाखोळे साहेबांनी सुद्धा आपल्या मार्गदर्शनात सत्संगाचे महत्त्व व धर्मपीठ करीत असलेल्या कामाचे कौतुक केले,शुभेच्छा दिल्या.

  डॉ. अभिमन्यू टकले,बापूसाहेब हटकर,श्री.कुवर साहेब यांनी सुद्धा मार्गदर्शन केले.

प्रा.शशिकलाताई सरगर,नंदाताई चाफले,डॉ. रक्षाताई महाजन,प्रमिलाताई फणसे यांनी सुद्धा आपले विचार मांडले.

सौ.पुष्पाताई करे,सुलोचनाताई मेहत्रे,मालाताई शिंदे,रेश्माताई ठोंबरे,प्रज्ञाताई पेशवे यांनी भक्ती गीत गायन करून वातावरण भक्तीमय केले.

श्री.ज्ञानेश्वरजी ढोमणे साहेबांनी आभार प्रदर्शन केले तर सौ.सारीकाताई ठोंबरे यांनी पसायदान सादर करून सत्संगाची सांगता केली.


✍️विनायक काळदाते

कार्याध्यक्ष

धनगर धर्मपीठ म.रा.


Sunday, January 2, 2022

धर्मपीठाचा ५० वा ऐतिहासिक सत्संग सोमवार दिनांक ३जानेवारी २०२२रोजी.

 🚩जे जे आपणासी ठावे l ते ते इतरांसी सांगावे l शहाणे करून सोडावे l सकळ जण ll


🕉️धर्मपीठाचा ऐतिहासिक  ५०वा आँनलाईन सत्संग सोमवार दिनांक ३जानेवारी२०२२ रोजी संध्या.७वाजता.

🚩प्रवचन-

१)ह.भ.प.नंदकिशोर       महाराज कोल्हे.

२)ह.भ.प.प्रल्हाद महाराज

    कळंब.

३)ह.भ.प.रमेश महाराज कचरे

४)ह.भ.प.घोंगे महाराज

५)ह.भ.प.घोडस्कर महाराज

६)ह.भ.प.प्रभाकरराव दिवनाले


🎤विचारपुष्प


प्रा.शशिकलाताई सरगर

प्रा.सविताताई दुधभाते

डॉ. अनिताताई खटके

डॉ. रक्षाताई महाजन

डॉ. पूजाताई सहावे

सौ.संगिताताई पाटील

वसुंधराताई लांडगे

शालिनीताई पगार

स्मिताताई पगार

सौ.रंजनाताई लांडे



🎤गायन-सौ.सुलोचनाताई मेहत्रे

            सौ.पुष्पाताई करे

           सौ.शोभाताई डहाके

           सौ.सारीकाताई बुरुले

            सौ.रेश्माताई ठोंबरे

             सौ.नंदाताई चाफले

              सौ.जयश्रीताई वाघ

              सौ.प्राप्ती चितळकर

               सौ.सुनीताबाई चुडे

                सौ.मालाताई शिंदे

                सौ.समिक्षा उपासे

                 सौ.प्रज्ञाताई पेशवे

                


🌹प्रमुख अतिथी🌹


मा.हरिदासजी भदे साहेब,

मा.आ.अकोला.


मा.रामरावजी वडकुते साहेब

मा.आ.हिंगोली.


मा.मुरहरी केळे साहेब

प्रमुख, त्रिपुरा राज्य विद्यूत मंडळ.


मा.श्री.चोपडे सर

अध्यक्ष, आ.धनगर साहित्य संमेलन, सांगोला.


 मा.पुरोषत्तमजी डाखोरे

माजी जि.प.अध्यक्ष नागपूर.


प्रा.संजयजी शिंगाडे

स्वागताध्यक्ष आ.धनगर साहित्य

संमेलन.


मा.विनोदजी ढोरे

कार्य. अभियंता,महावितरण.

     तसेच

विविध क्षेत्रात कार्यरत समाजधुरीण.


 सत्  संगती सदा घडो। सुजन वाक्य कानी पडो’ असं म्हणतात. माणसाला चांगल्याची संगत परमार्थात नि प्रपंचातही महत्त्वाची आहे. सत् संगतीसाठी घर सोडून बाहेरच जायला हवं, असं नाही, तर संतांच्या ग्रंथाचं वाचन, मनन, चिंतन ही सत्संगतीच होय. सत्संगाशिवाय विवेक नाही. विवेकाशिवाय ज्ञान नाही. सत्संग हा आनंदाचा पाया आहे. साधन-सिद्धींचं फळही आहे.  ‘सत् संगतीनं माझं मनोरथ पूर्ण झालं, माझा अवघा शीणभार गेला. दारिद्र्य दूर पळालं, जन्माचं सार्थक झालं,’ अशा आशय-अनुभुतीचे कितीतरी अभंग आहेत.

    धार्मिक व्यासपीठावरुन समाजाचे प्रबोधन करून समाजाचा धार्मिक, आध्यात्मिक, शैक्षणिक, आर्थिक, आरोग्य तसेच सामाजिक व राजकीय विकास साधन्याच्या उद्देशाने कार्यरत धनगर धर्मपीठ मागील ५०आठवड्यांपासून दर सोमवारी आँनलाईन सत्संग आयोजित करत असतो.

या सोमवारी दिनांक ३जानेवारी २०२२ रोजी संध्या. ७वा. धर्मपीठाचा ऐतिहासिक असा ५०वा सत्संग आहे. या सत्संगाला ह.भ.प.मंडळी सोबतच समाजातील सामाजिक, राजकीय, प्रशासन, शेती,उद्योग ,साहित्य,व्यवसाय, शैक्षणिक क्षेत्रातील समाजधुरीण सुद्धा सहभागी होतील व आपल्या प्रबोधातून समाजाचे प्रबोधन करतील.

 आपण सर्वांनी या ऐतिहासिक आँनलाईन सत्संगाला हजेरी लावावी ही विनंती.

सत्संगामध्ये जाँईन होण्यासाठी लिंक👇



To join the meeting on Google Meet, click this link: 

https://meet.google.com/bgs-rzeh-ibn 

 

Or open Meet and enter this code: 1234567



✍️विनायक काळदाते,कार्याध्यक्ष

   धनगर धर्मपीठ, म.राज्य.


  

सांगली येथील पु.अहिल्यादेवी होळकर स्मारक लोकार्पण सोहळ्यास हार्दिक शुभेच्छा.

 पुण्यश्लोक अहिल्यादेवी, होळकर स्मारक लोकार्पण सोहळा सांगली. दि ०२|०४|२०२२. सांगली महानगर पालीकेचा एक अतिशय चागंला उपक्रम.  🕉️🕉️🕉️🕉️🕉️...