Monday, October 18, 2021

धर्मपीठ ३९वा सत्संग संपन्न🚩

 धर्मपीठ ३९वा सत्संग संपन्न🚩



हरी नाम ना जपतीl परी नाना तिर्थे हिंडती l तयाची ही स्वार्थी भक्तीl कैसी लाभेल मना शांती ll

  धर्मपीठाच्या ३९व्या सत्संगात ह.भ.प.कोल्हे महाराजांनी हरिपाठाच्या दहाव्या अभंगावर निरुपन केले तर ह.भ प.कळंब महाराजांनी विष्णूसहस्त्रनामावर ९वे पुष्प गुंफले.दोन्ही महाराजांनी नामस्मरणाचे महत्त्व सांगताना जनतेच्या वर्मावर बोट ठेवले.मुखात देवाचे नाव नाही आणि तिर्थाटन सुरू आहे या दांभिकतेवर महाराजांनी आसूड ओढले व नामस्मरणाचे महत्त्व अधोरेखित केले.तत्पूर्वी सौ.पुष्पाताई करे यांनी हरिपाठाच्या दहाव्या अभंगाचे गायन केले.ह.भ.प.घोडस्कर महाराज, कचरे महाराज,गाडगे महाराजांनी प्रार्थना सादर केल्या.

  डॉ. अभिमन्यू टकले,बापूसाहेब हटकर, ज्ञानेश्वरजी ढोमणे,मा.कुवर साहेब यांनी धर्मपीठाच्या वाटचालीवर समाधान व्यक्त केले.

  सौ.सुलोचनाताई मेहत्रे,शोभाताई डहाके, मालाताई शिदे,पेशवे ताई,प्राप्तीताई चितळकर, शारदाताई ढोमणे यांनी भक्तीगीत सादरीकरण केले तर सौ.रेश्माताई ठोंबरे यांनी पसायदान सादर केले.

  सत्संगाला ह.भ.प.कोल्हे महाराज, कळंब महाराज, दिवनाले महाराज, घोडस्कर महाराज, कचरे महाराज, डॉ. अभिमन्यू टकले,बापूसाहेब हटकर,ज्ञानेश्वर ढोमणे,विनायक काळदाते, हिमांशू शिदे,पियुष दिवनाले,राजेश दिवनाले सर माणिकराव गुलवाडे,संतोष पेशवे,डॉ. गोपाळ कळंब,ज्ञानदीप शिंदे तसेच शारदाताई ढोमणे, पुष्पाताई करे,रेश्माताई ठोंबरे,सुलोचनाताई मेहत्रे,शोभाताई डहाके,प्रमिलाताई फणसे,समिक्षाताई उपासे,प्राप्तीताई चितळकर, मालाताई शिंदे,पेशवेताई, रिया काळदाते व श्रोतेजन उपस्थित होते.


🕉️🚩🕉️🚩🕉️🚩🕉️🚩

Tuesday, October 12, 2021

स्व.मा.आ.आनंदराव देवकते साहेबांना विनम्र अभिवादन.

 स्वर्गीय.        आनंदरावजी देवकते .राजकारणातील स्वयप्रकाशीत धनगर तारा. 💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐 विनम्र अभिवादन. 🔯🔯🔯🔯🔯🔯🔯🔯🔯🔯🔯🔯

आनंदराव नारायणराव देवकते यांचा जन्म सामान्य शेतकरी धनगर कुटुंबात राजुर  या खेडेगावात ता.दक्षिण सोलापूर जि.सोलापूर येथे झाला.  सत्य आणि प्रमाणीकपणा हा धनगर जमातीचे गुणसुत्रातच.ते धनगर असलेतरी ते धनगर जमातीचे नेते नव्हते. ते कांग्रेस चे राज्य स्तरीय नेते होते. सर्व जाती धर्माचे नेते होते. त्यामुळे २५ वर्षे आमदार आणि ५वर्षे मंत्री आणि ५वर्षे महानंदचे अध्यक्ष. लातूरचे पालकमंत्री राहूनही रहाण्याच्या घरातही बदल झाला नाही

राजकारणाची सुरुवात च राजूर गावचे संरपच म्हणून झाली.. 

खरतर बैरीस्टर टि.के.शेंडगे सहीत एकदम १२ धनगर आमदार स्वबळावर विना खर्च विधानसभेवर स्वतंत्र निवडून आले .तत्कालीन मुख्य मंत्री यशवंतराव चव्हाण आणि मराठा नेत्यांनी धनगर परत विधानसभेत दिसू नये म्हणून ३६ धनगर बहुल मतदार संघ राखीव ठेवले . राजकीय राख झालेल्या धनगर जमातीची     आणखी राख करून उजनी धरणात फेकून दिली.  धनगर जमातीचे  राजकीय अस्तित्व २०१४पर्यंत शुन्य करून टाकले.

दक्षिण सोलापूर तालुका मतदार संघ राखीव ठेवला नाही कारण आंनदराव देवकते संघटन मध्ये खूप हुशार होते. मी त्यांना अनेक वेळा भेटलो. ते अनेक वेळा आमच्या रुग्णालयात डायबेटिक फुट या आजारामुळे येत असत.आणि मी भेटलो की मी गप्प बसत नव्हतो राजकारण आलेच.मला ते म्हणत कांग्रेस माझी आई सोनिया माझी मायी मी त्यांची दायी  ते हे जाहीर सभेत ही म्हणत.मी ती निष्ठा ऐकूण तोंडात व कपाळावर मारून घ्यायचो. ६वेळा त्यांना या प्रमाणीक पणामळे तिकीट  मिळाले. दक्षिण तालुक्यात मतदार गणीत धनगर ८२००० मुस्लिम ६५०००कोळी लमान ३५००० आणि लिंगायत ८०००० दलित १५००० मराठा १५००० . देवकते साहेब फक्त धनगर म्हणून धनगर मतदान व कांग्रेस म्हणून मुस्लिम दलित मतदान फिक्स असायचे .लिंगायत आणि मराठा प्रंचड विरोध करायचे .ते राजूर ग्रामपंचायत चे सरपंच व १९६३ला दक्षिण तालुका उपसभापती झाले .तरीही १९७८ ते१९९३ व १९९९ते २००३ पंचवीस वर्षे आमदार राहिले.

२००३ला प्रमाणीक पणे आमदार कीचा राजीनामा देऊन मुख्य मंत्री सुशिलकुमार शिंदे साठी जागा रिक्त केली .  शिदेंनी परतफेड म्हणून खासदारकिचे तिकीट देवकते साहेबांना दिले .निवडणूकीने धनगर खासदार होवुन संसदेत जावू नये म्हणून महाराष्ट्रातील तमाम मराठा समाज गोपीनाथ मुंडे,  उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहीते यांनी एक केला आणि धनगर संसदेत जान्यापासून रोखला.प्रतापसिंग मोहीते ना निवडून दिले.खरतरं गोपीनाथ मुंडे  साहेबांनी व  मराठा नेत्यांनी भाजपामधून रामहरी रुपनवर,सुभाष पाटील, आण्णा डांगे,मा.प्रकाश आण्णा  शेंडगे व कांग्रेस मधून आनंदराव देवकते यांची माती केली.देवकते साहेबांचा पराभव धनगर म्हणून आमच्या जीवाला लागला. २००३ते 

२००४ला आम्ही सर्वांनी एकत्र येवून डॉ .इंद्रकुमार भिसे सचिव व महादेवजी जानकर यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय समाज पक्षाची स्थापना केली . पुन्हा दक्षिण सोलापूर रचे बाय इलेक्शन लागले अर्जुन सलगर जिल्हा अध्यक्ष होते त्यांचे वय कमी म्हणून त्यांच्या बंधूंना रासपाचे तिकीट देवून उभा करून आम्ही मुख्यमंत्री सुशिलकुमार शिंदे यांच्या पत्नी ला पराभूत केले.देवकते साहेबांचा बदला घेतला. नंतर देवकते साहेबांना महानंदचे अध्यक्ष केले.मला जानकर साहेबांनी यशवंत सेना अध्यक्ष बनवले  आणि अर्जून सलगर आणि मी सोलापूर जिल्ह्यात ६५० शाखा उभा केल्या.आम्हाला गोपीनाथ राव मुंडेचा राग होता. भाजपचे २१ सदस्य झेडपीत होते.  आर. जी. रुपनर आप्पा विरोधी पक्षनेते होते. झेडपी इलेक्शन लागले आम्ही प्रत्येक भाजपा विरोधात रासप उमेदवार दिला सगळा भाजपा व कांग्रेस पराभूत करून टाकले दुसरा बदला घेतला.नंतर जानकर  साहेबांनी रिडोलस स्थापन केले मगळंवेढा पंढरपूर एक लाख धनगर मतदान आहे  विजयसिंह मोहीते उभे राहिले धनगर जमातीने पाडून टाकले आणि धनगर जमातीचा राजकीय शत्रू असलेले मोहीते घराने जवळपास संपले आहे.

पंढरपूर ते बारामती आरक्षण दिंडी पहिली  बैठक मे २०१४ सोलापूरात झाली.आम्ही प्रंचड प्रसिध्दी दिली त्याच्या कटींग आजही आमच्या कडे आहेत आग लागल्या नंतर आम्ही दिडींतुन निघून गेलो.दिंडी मुळे धनगर कांग्रेस राष्ट्रवादी मधून बाहेर आला. कांग्रेस  राष्ट्रवादी मध्ये मुस्लिम दलित राहीला होता मग शक्कल लढवली धनगर दलित मुस्लिम गणीत मांडले.अर्जुन दादानी मला अगोदर विरोध केला आपल्याला बाळासाहेब आंबेडकर चालतील पण ओवेसी नको .नंतर दादा तयार झाला .आम्ही बैरीस्टर ओवेशींना भेटलो आणि मुस्लिम दलित कांग्रेस राष्ट्रवादी पासून दूर करण्यात यशस्वी झालो. महाराष्ट्र राज्यात आम्ही देवकते साहेब व धनगर जमातीचा केलेला राजकीय आपमानाचा बदला घेण्यात यशस्वी झालो.ओवेसी साहेब एमआयएम जिंकले.आम्ही जातीय राजकारणाचा बदला घेतला.

पण देवकते साहेब सर्वांचेच कांग्रेसी ज्येष्ठ नेते होते. त्यांना दक्षिण सोलापूर मतदार संघातील घर ,प्रत्येक माणसाची जमीनीचा बांध कोठे संपतो हे माहीत होते.ते धनगर नेता होण्याचे प्रयत्न ही करत नव्हते त्यांचेच योग्य होते.मा.आमदार गणपतराव देशमुख नंतर राज्यातील ज्येष्ठ आणि सर्वात जास्त काळ विधान सभेत असलेले नेते आंनदराव देवकते होते. त्यांना जर परत सतत  तिकीट दिले असते तर ते दुसरे विक्रम वीर प्रमाणीक धनगर  होते.म्हणून च या भ्रष्ट व्यवस्थेने त्यांना तिकीट दिले नाही.धनगर शुद्ध, प्रमाणीक ,परोपकारी असल्याने सतत निवडून येतात जर का पन्नासीक आले तर परत धनगरजमाती व्यतिरिक्त कोणच नसेल म्हणून सर्वच पक्ष जमातीला तिकीट देण्यासही घाबरत आहेत.हे वास्तव आहे.

देवकते साहेबांनी सर्व जाती धर्माला सहकारी साखरकारखाना , बाजारसमिती,बैंक  इतर पदे बहाल करुन सत्तेचा समतोल राखला.

शेवटी एवढेच म्हणेल देवकते साहेब तुम्ही जन्माने धनगर होते पण कर्माने  महात्मा गांधी होते. तुम्ही खूप सहन केले सोसले.  तुम्ही शरीरानं नाहीत तर कर्तृत्वाने आमच्यात असाल.तुमच्या जीवनाचा तारा निखळला असला तरी कर्तृत्वाचे तेज सतत तेवत राहील. तुम्हाला आणि तुमच्या जातीला राजकारणात नष्ट करु इच्छीनारांनी जर योग्य वाटा दिला नाही आश्वासने देवून पाळली नाहीत तर २०२४ पर्यंत तुमची जमात या दुष्ट कौरवांना नष्ट करुन  सत्यवादी राजांना गादीवर बसवून तुमचा वारसा चालवण्याचा प्रयत्न करेल हीच धनगर जमातीचे आपणाला भावपूर्ण 💐💐विनम्र अभिवादन💐💐.हर और जित तो मर्दोके किस्मत के दो सितारे होते है! .देवकते साहेबांचे कार्य पाहून  थंड बसायला आम्ही षंड नाहीत. बदला घेतलाय.पडायला , पाडायला,लढाईला शिकलोय रडायला नव्हे. आम्ही लढतच मरणार रडत नव्हे. जब तक जियेंगे तब तक लढेंगे,हरेंगे तो औरभी भी लढेंगे, भिक नही लेंगे.  जरूर एक दिन का याब होंगे. .स्वर्गीय देवकते साहेब. 

आपलाच जमात वारस. 

डॉ अभिमन्यु टकले 

संस्थापक 

धनगर धर्म पीठ

 धनगर  साहित्य संमेलन

महाराष्ट्र राज्य.

                                प्रकाशक: प्रसिद्धी:

श्री  विनायक काळदाते-कार्याध्यक्ष धनगर धर्म पिठ महाराष्ट्र राज्य 🌹👏🏻🌹👏🏻🌹👏🏻🌹👏🏻🌹👏🏻🌹👏🏻🌹👏🏻🌹


Sunday, October 10, 2021

"अखंड होळकरशाही"पुस्तकाचे लेखक श्री.उज्वलकुमार माने व धर्मपीठ संस्थापक अध्यक्ष डॉ. अभिमन्यू टकले यांची भेट.

 अखंड होळकर शाही पुस्तकाचे  लेखक व पत्रकार उज्ज्वलकुमार माने यांची भेट.  -----------------------------

प्रा. डॉ अभिमन्यु टकले. 

8793222817

-----------------------------

श्री उज्ज्वलकुमार माने हे मला ऑगस्ट मध्ये भेटायला आले व अंखड होळकर शाही पुस्तक भेट देवून गेले.मी पुजा अर्चा करत होतो आणि म्हणून मी पुस्तक भेट मिळाल्याचा फोटो घेतला नाही.पुस्तक वाचा आणि  कसे आहे ते सांगा एवढे बोलून ते पाच मिनिटात निघून गेले. ते जाताना मी त्यांना सांगीतले तुम्ही खूप कष्ट घेऊन पुस्तक लिहले मी वाचेलच आणि पुस्तक राज्यात गाजेलच.

मला पुस्तक वाचायलाच  तिन आठवडे लागले. मी पुस्तक परिचय व परिक्षणही लिहले होते.मी पुस्तक वाचले आणि  एक माहिती देणारा लेख ही लिहला. खरंतर ते परिक्षणही नव्हत आणि जाहिरात ही नव्हती. मला आवडले मी लिहले. आश्चर्य असे की आठवडा भरात त्याच पुस्तकावर, अनेक  साहित्य, इतिहासाची आवड असनारे जमातीच्या इतिहास प्रेमींनी परिक्षण लिहीले .सोसेल मिडीयात आणि प्रिंट मिडीयात ही राज्य भर गाजले.समाज सजग होत आहे वाचत आहे हे ही प्रकर्षाने जाणवले. या पुस्तकाला राज्य भरातून मागणी ही येवू लागली. 

रविवारी  आणखी ते पुस्तक घेऊन आले चेहर्‍यावर आनंद होता.पुस्तक लिहल्याचे समाधानही दिसत होते. राज्य स्तरीय 

पहिले आदिवासी धनगर साहित्य संमेलनाच्या वेळेस सोलापूर येथे माझे मनोबल राखण्याचे  काम येथील सर्व पत्रकार बांधवानी केले होते.मला पत्रकार म्हणाले होते ,साहेब तुम्ही काळजी करू नका कोणीच आले नाहित तर आम्ही चाळीस पत्रकार दोन दिवस सभागृहात बसून राहू संमेलन यशस्वी करू. या सर्व प्रक्रियेचे जनक श्री उज्ज्वलकुमार माने, भरत कुमार मोरे आणि सर्व पत्रकार बंधु होते. आज जी धनगर जमातीची प्रतीमा राज्यात निर्माण झाली आहे त्याचे जनक सोलापूर चे सर्व प्रिंट मिडीयातील पत्रकार आहेत.

सोलापूर ही साहित्य, कला,सांस्कृतिक, ऐतेहासिक नगरी आहे. सोलापूर  येथील पत्रकार  व्यावसायिकतेचे व्यापारीकरण झालेले असतानाही, स्वातंत्र्य, समता, बंधुता,नैतिकता यांचे  पालन करत असतात.पत्रकार हा दररोज लेखक असतो. आजही उज्वलकुमार माने यांनी आदिवासी धनगर साहित्य संमेलन सांगोला हे लवकर व्हावे अशी अशा व्यक्त केली.कोरोना ची तिसरी लाट आलीच नाही. त्यामुळे दिवाळी झाली की स्वागताध्यक्ष,अध्यक्ष, माजी अध्यक्ष ,सर्व राज्यातील सहकारी यांच्या सल्ल्यानुसार चौथे आदिवासी धनगर साहित्य संमेलन जाहिर करू असे सांगितले. उज्वलकुमार माने यांनी साहित्य संमेलना साठी काही सुजाव ही सांगितले.साहित्य आणि धर्म संमेलनाच्या ठरावांना खूप महत्व असते. समाजाचे दखलपात्र मान्यवर ,पत्रकार, समाजसेवक,साहित्यीक संमेलनात सहभागी होत नसतील तर त्यांच्या विरोधात ठराव पास करायला पाहिजेत.चौथे आदिवासी धनगर साहित्य संमेलन  सांगोला येथे अखंड होळकरशाही हे पुस्तक स्टाल वरती ऊपलब्ध करून देवू असेही उज्वलकुमार माने यांनी सांगितले.तसेच सोलापूर  येथे प्रिंट मिडिया  पत्रकार म्हणून जे करता येईल ते सर्व सहकार्य करू असेही त्यांनी अश्वासन दिले.✒️✒️✒️✒️✒️✒️✒️✒️✒️✒️✒️✒️✒️✒️✒️✒️✒️✒️✒️✒️


Tuesday, October 5, 2021

"श्रद्धावान लभते ज्ञानम-शंकात्मा विनश्ती"सत्संगामधून लाभो सन्मती.धर्मपीठाचा ३७वा सत्संग संपन्न.

 श्रद्धावान लभते ज्ञानम-शंकात्मा विन्शती-सत्संगामधून लाभो सन्मती.🚩

   धार्मिक व्यासपीठावरुन समाज शिक्षण, प्रबोधन व सर्वागीण समाज विकास साधन्याच्या हेतूने कार्यरत धर्मपीठाच्या ३७व्या साप्ताहिक आँनलाईन सत्संगामध्ये हरीपाठाच्या ८व्या अभंगावर ह.भ.प.कोल्हे महाराज यांनी चिंतन केले तर विष्णूसहस्त्रनामावर ह.भ.प.कळंब महाराज यांनी निरुपन करताना आयुष्यात माणसिक शांतते साठी,सुख समाधान व प्रगतीसाठी व ज्ञान प्राप्तीसाठी नामस्मरणाचे महत्त्व सांगितले. श्रद्धा असेल तरच ज्ञान मिळेल व त्याचे फळ मिळेल तसेच शंकाखोर ,संशयी प्रवृत्तीने नुकसानच होईल असे सांगितले. जागतिक पातळीवर सोशल मेडीया नेटवर्क बाधीत झाले असताना सुद्धा सौ.शारदाताई ढोमणे व श्री.ज्ञानेश्वरजी ढोमणे दाम्पत्याने प्रयत्नाची पराकाष्ठा करत सत्संग पूढे नेला. 

  सुरुवातीला ह.भ.प.घोडस्कर महाराज यांनी प्रार्थना व सौ.पुष्पाताई करे यांनी हरीपाठ अभंग ८व्याचे गायन केले.तदनंतर ह.भ.प.कळंब महाराजांनी विष्णूसहस्त्रनामावर निरुपन केले.

 सौ.सुलोचनाताई मेहत्रे,सारीकाताई ठोंबरे,नंदाताई चाफले,शोभाताई डहाके,रंजनाताई लांडे यांनी आपले भक्तीगीत/प्रार्थना सादर केल्यात.

  ह.भ.प.दिवनाले महाराज, कचरे महाराज,डॉ. अभिमन्यू टकले,बापूसाहेब हटकर,काशिनाथजी फुटाणे, डॉ. मधुकरराव सलगरे यांनी आपले विचार व्यक्त केले.

  कार्यक्रमाला ह.भ.प.कोल्हे महाराज, कळंब महाराज, दिवनाले महाराज,कचरे महाराज, घोडस्कर महाराज,डॉ. अभिमन्यू टकले,बापूसाहेब हटकर, ज्ञानेश्वरजी ढोमणे,विनायक काळदाते,काशिनाथजी फुटाणे,डॉ. मधुकरराव सलगरे,सौ.शारदाताई ढोमणे, प्रा.शशिकलाताई सरगरे,प्रा.प्रितीताई शिंदे,सारीकाताई ठोंबरे(बुरुले),कुमार ठोंबरे(बुरुले),रेश्माताई ठोंबरे,रंजनाताई लांडे,नंदाताई चाफले,पुष्पाताई करे,शोभाताई डहाके,रिया काळदाते, समिक्षाताई उपासे तसेच हरी लबडे,शिवगनेश देवकर,राजेश खरात,चुडे महाराज, रोहित करे,माणिकराव गुलवाडे,पियुष दिवनाले,तुषार कोल्हे,कु.क़ोल्हे व समाजबांधव उपस्थित होते.


🚩🕉️🚩🕉️🚩🕉️🚩🕉️













सांगली येथील पु.अहिल्यादेवी होळकर स्मारक लोकार्पण सोहळ्यास हार्दिक शुभेच्छा.

 पुण्यश्लोक अहिल्यादेवी, होळकर स्मारक लोकार्पण सोहळा सांगली. दि ०२|०४|२०२२. सांगली महानगर पालीकेचा एक अतिशय चागंला उपक्रम.  🕉️🕉️🕉️🕉️🕉️...